श्रावण बाळ योजना असा करा अर्ज | Shravan Bal Yojana Maharashtra 2022

Shravan Bal Yojana Maharashtra 2022 – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 65 व 65 वर्षावरील कुटूंबाचे नांव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रयरेषेखालील यादीत समाविष्ट असावे.

रु.300/- प्रतिलाभार्थीी प्रतिमहिना + याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली रु. 200/- असे एकूण रुपये 500/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी.

Shravan Bal Yojana Maharashtra 2022

दारिद्रयरेषेखालील कुटूंबाचे यादीत नाव असणे आवश्यक. वयाचा दाखला ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहितील उता-याची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला.  ‘Shravan Bal Yojana Maharashtra’

दारिद्रयरेषेखालील यादीत नांव दारिद्रयरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती/कुटूंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतरा. रहिवाशी दाखला– ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरिक्षक, नायब तहसिलदार किंवा तहसिलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी अतिरिक्त अटी

  1.  किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
  2. लाभाथ्यांची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (शासकीय/निमशासकीय / खाजगी) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात यावा.
  3. मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (शासकीय / निमशासकीय/खाजगी) मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात यावी.
  4. मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तीला नोकर मिळेपर्यंत (शासकीय / निमशासकीय / खाजगी) लाभ मिळेल. या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या (शासकीय / निमशासकीय / खाजगी) अविवाहीत मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करुन लाभाथ्र्यांची पात्रता ठरविण्यात यावी. “Shravan Bal Yojana Maharashtra 2022”
  5. मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटूंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात यावे.
  6. लाभार्थ्याच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रु.21,000 /- पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होईल.
  7. या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही.

श्रावण बाळ योजना महाराष्ट्र 2022

अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतीमंद या सर्व प्रवर्गातील अपंगांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रु.21,000/- पर्यंत असावे.

अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर मतीमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतूदीप्रमाणे निर्णय होईल. (किमान 40% अपंगत्व असलेल्या व्यक्तीस या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरतील) Shravan Bal Yojana Maharashtra

यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील. शारिरीक छळवणुक झालेला अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारीत स्त्रीयांच्या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन) व महिला बालविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.

Shravan Bal Yojana Maharashtra

घटस्फोट प्रक्रीयेतील स्त्रीया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळया राहणाऱ्या स्त्रीयांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलची संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेले व तहसिलदारांनी साक्षांकित केलेले (अॅटेस्टेड) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल. Shravan Bal Yojana Maharashtra

घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.

श्रावण बाळ योजना महाराष्ट्र 2022

वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत, महिला व बालविकास अधिकान्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ मिळेल. आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. अनाथ मुले/मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल. विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील. “Shravan Bal Yojana Maharashtra Online Form”

पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषदेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहील. संजय गंधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी जमीन आहे किंवा नाही, याचा विचार न करता उत्पन्न मर्यादा रु.21,000/- पर्यंत असेल तर लाभ मिळू शकेल.

अर्ज करण्याची पध्दत

  •  अर्जदार या शासन निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी निर्धारित केलेल्या नमुना एक मधील अर्जाच्या दोन प्रती, तो रहात असलेल्या भागाच्या संबंधित तलाठ्याकडे करील.
  • अशा अर्जासोबत वर नमूद केलेल्या पात्रतेच्या अटींच्या पृष्ठयर्थ संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडण्यात यावीत. नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून अशा प्रमाणपत्रांच्या व कागदपत्रांच्या दोन प्रती अर्जदाराने मिळवाव्यात.
  • तलाठी यांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जाची तपासणी करुन अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावी. तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक राहील.
  • तलाठी यांनी प्राप्त अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्राची छाननी व पडताळणी करुन अर्ज संबंधित तहलिसदार/नायब तहसिलदार यांचेकडे पाठवावेत.

फॉर्म डाऊनलोड करायेथे क्लिक करा

लाभार्थी

  • गट (अ) : 65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना.
  • गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु.400/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहाअसे एकूण रु.600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
  • गट (ब) : या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 600/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.

लाभ

प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते.

अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकता

फॉर्म डाऊनलोड करा - येथे क्लिक करा

संपर्क कार्यालयाचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय किंवा भेट द्या – https://sjsa.maharashtra.gov.in/mrscheme-category/special-assistance

 

महिन्याला किती पेन्शन मिळते?

महिन्याला 600 रुपये पेक्षा जास्त पेन्शन दिली जाते.

महाराष्ट्र श्रावणबाळ योजना काय आहे?

ही एक वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे, ज्या अंतर्गत राज्यातील वृद्ध लोकांना, ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना पेन्शन दिली जाते.

1 thought on “श्रावण बाळ योजना असा करा अर्ज | Shravan Bal Yojana Maharashtra 2022”

Leave a Comment

close button