3 एप्रिल 1680 : छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? | 3 april 1680 in marathi

By Shubham Pawar

Published on:

3 april 1680 in marathi – 3 एप्रिल 1680,चैत्र पौर्णिमा,शा.श. 1602,सहस्त्रसूर्यांच्या तेजालाही झाकोळून टाकणारा शिवसूर्य भर मध्यान्ही अस्ताला गेला…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नुकतीच 3 एप्रिल रोजी तारखेनुसार शिवरायांची पुण्यतिथी येऊन गेली; आता 22 एप्रिल,हनुमान जयंतीला तिथीनुसार शिवपुण्यतिथी आहे; असे ऐतिहासिक दिनविशेष आले, म्हणजे समाजविघातक शक्तींच्या कार्याला ऊत येतो. सोशल मिडीयावर ऊठसूठ जातिय तेढ पसरवणारे मेसेजेस्,पोस्ट यांचा सुळसुळाट होतो.

3 april 1680 in marathi

शिवरायांचा मृत्यू ब्राह्मण मंत्र्यांनी विषप्रयोगाने घडवून आणला अशी ओरड अधुनमधून ऐकू येते. सध्या अजून एक मेसेज फिरतो आहे; त्यात मोरोपंत पेशवे, अण्णाजीपंत दत्तो व राहुजी सोमनाथ यांनी शिवरायांची हत्या कशी केली, याचे बटबटीत वर्णन केले आहे.हनुमान जयंतीच्या दिवशी जगदिश्वराच्या मंदिरात पुजा चालू असताना तीन ब्राह्मण मंत्र्यांनी ‘वामनी कावा’ कसा साधला याचे इतके ओंगळपणे वर्णन केले आहे, की कोणीही इतिहासप्रेमी ते वाचून व्यथित झाल्याशिवाय राहणार नाही. या घोर आक्षेपांना मी माझ्या अल्पमतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराजांचा मृत्यू कसा झाला, हे आता उपलब्ध कागदपत्रांवरून काहीसे स्पष्ट आहे. महाराजांच्या मृत्यूबद्दल काही समकालीन व उत्तरकालीन नोंदी पुढीलप्रमाणे देता येतील 3 april 1680 in marathi –

  1. सभासद बखर – मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली. राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे. विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.अ सें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.
  2. जेधे शकावली – शके 1602 रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला.
  3. मुंबईकर इंग्रजांचे सुरतकरांना पत्र (28th April1680) – We have certaine news that Sevajee Rajah is dead. It is now 23 days since he deceased,it is said of a bloody flux being sick 12 days.
  4. Storia Do Mogor (असे होते मोगल-मराठी अनुवाद,ज.स. चौबळ) – तो(शिवाजी)सारखा मोहिमेवर चहुकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन 1679 मध्ये मरण पावला. याच अनुवादात मासिरे आलमगिरीतील तळटीप दिली आहे. आमदानीचे 23वे वर्ष 1091 हि. (मे 1680) घोड्यावरून रपेट करून आल्यावर त्याला(शिवाजीला) उष्णतेमुळे दोनदा रक्ताची उलटी झाली.[मासिरे आलमगिरी पृ.154]
  5. भोसले घराण्याची बखर – शके 1602 रौद्रनाम संवत्सरे फसली सन 1090 राज शके 7 या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते. तेथेच महाराज छत्रपती यांस व्यथा ज्वराची जाहाली, ते समई महाराज पुण्यश्लोकी व त्रिकालज्ञानी सर्व जाणते याणी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहाली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे वगैरे मंडळी यांस बोलावून आणिले.
  6. History of Marathas- Grant Duff(मराठी अनुवाद-डेव्हीड कॅपोन) यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला.तो प्रकार असा; शिवाजी रायगडी असताना त्याला गुडघी म्हणून रोग झाला,तो प्रतिदिवशी वृद्धींगत होत चालला.मग त्याच्या योगेकरून मोठा ज्वर आला.ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला.
  7. History of Aurangzib(vol. IV,southern India 1645-1689) – Jadunath Sarkar –
    “On 23rd of March 1680, ( 3 april 1680 in marathi) the Rajah was seized with fever and blood dysentry.The illness continued for twelve days.Gradually all hopes of recovery faded away,and then after giving solemn charges and wise counsels to his nobles and officers ….the maker of Maratha nation performed the last rites of his religion and then fell into trance,which imperceptibly passed into death.”
  8. ’तारीखे शिवाजी’ या माॅडर्न रिव्ह्यू मासिकातील जदुनाथ सरकार यांनी प्रकाशित केलेल्या फारसी चरित्राचा वि.स.वाकसकर यांनी 91 कलमी बखरीत इंग्रजी अनुवाद दिला आहे, ‘…..as the maharajah’s destined period of life had come to it’s end the queen’s heart changed and she did an act (poisoning ?) which made Shivaji give up his life..’
  9. शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 2,लेखांक – 2286 डाग रजिस्टर 1680 { 3 april 1680 in marathi} मधील नोंदीतही ‘शिवाजीवर त्याच्या बायकोने विषप्रयोग केल्याचा’ संशय व्यक्त केला आहे..

3 april 1680 in marathi लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी, की वरील दोन्ही साधनांतही केवळ संशय व्यक्त केला आहे, इतरत्र त्याला दुजोरा दिल्याचे दिसत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला?

शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड- 2 मध्ये लेखांक 2249 ते 2253,2258 ते 2261 ,2275,2281,2286,2302,2307 इ. मध्ये परदेशी व्यापा-यांच्या पत्रांत महाराजांच्या मृत्यूविषयी अनेक नोंदी आहेत; मुळात महाराजांचा मृत्यू झाला की नाही याबद्दल शत्रुंच्या मनात गोंधळ उडालेला दिसून येतो. परंतु लेखांक 2286 वगळता अन्यत्र कोठेही महाराजांच्या मृत्यूविषयी संशयास्पद घटनेची नोंद नाही.

वरील उपलब्ध साधनांत शिवरायांच्या मृत्यूची तारीख व इतर बारीकसारीक तपशील यात चुका आहेत;पण सर्व साधनांमध्ये महाराजांचा मृत्य ज्वराची व्यथा व रक्तसार यामुळे झाल्याचे जवळपास एकमत दिसते.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवण्याची काही मंत्र्यांची मसलत झाली,ही मसलत असफल ठरून संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला (जुन1680 संभाजीराजांनी रायगडावर कारभार हाती घेतला), मंत्र्यांना माफ करून त्यांना अष्टप्रधानांत जागा दिली(राज्यभिषेक-जानेवारी 1681), मोरोपंत पेशव्यांचा तोपर्यंत वृद्धपकाळाने मृत्यू झाला होता(12ऑक्टोबर1680); ( ‘3 april 1680 in marathi’ ) त्यांच्यापश्चात त्यांचे पुत्र निळोपंत यांना पेशवेपद बहाल केले; पण आधीच एकमेकांबद्दल कलुषित झालेली मने पूर्णपणे निवळली नाहीत व संभाजीराजांच्या खुनाचे काही कटकारस्थान केल्याच्या संशयावरून संभाजीराजांनी अण्णाजीपंत दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी व कटाशी संबंधित इतर व्यक्तींना मृत्यूदंड दिला. (ऑगस्ट 1681)

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा नक्की काय आहे? जाणून घ्या | CAA act in Marathi

3 april 1680 in marathi

मराठी साम्राज्याची छोटी बखर मध्ये दिलेला उल्लेख असा,”…महाराज निधन पावताच किल्ल्याचे दरवाजे लागले. आपाजीपंतास(अण्णाजीपंतास?) व निळोपंतास(इथे तपशीलात चूक आहे, निळोपंत रायगडावरच होते, मोरोपंत हवे) पत्र पाठवून सहावे रोजी आणविले. मोरोपंत याकाळात नासिक भागात(हणमंतगड-त्र्यंबकक्षेत्र-मुल्हेर 3 april 1680 in marathi)स्वारीवर होते, असा वेळोवेळी उल्लेख येतो. महाराजांच्या मृत्यूसमयी हंबीरराव मोहिते क-हाडला, अण्णाजीपंत दत्तो चौलला, तर मोरोपंत नासिक परिसरात होते.

निळोपंतांची कारकीर्द पहाता त्यांच्यावर तर संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बखरींतील उल्लेख पहाता अंत्यसमयी अष्टप्रधानांतील महत्वाच्या व्यक्ती रायगडावर नव्हत्याच. काही ब्राह्मण मंत्री, कारकून यांबरोबर सरदार, हुजरे व इतर काही मराठेही राजांजवळ होते; अशावेळी कोणीही-तेही विशिष्ट जातीच्या दोघा-तिघांनी महाराजांचा खून करणे कसे शक्य आहे?

वर उल्लेखलेल्या घटना व संदर्भ लक्षात घेता पुढील गोष्टी समजतात – 

  • आधी विषप्रयोग,नंतर गळा आवळणे,ओरडू नये म्हणून नाक-तोंड दाबणे असे महाराजांच्या खुनाचे अत्यंत ओंगळ,क्लेशकारक,बिनबुडाचे बिभत्स वर्णन करण्यात आले आहे;मात्र अशा पद्धतीने खून केलाच असता,तर मागाहून येणा-या विश्वासू व्यक्तींना झटापटीच्या काहीच खुणा अजिबात दिसल्या नाहीत का,राजांचा शांतपणे नैसर्गिक मृत्यू झाला हे इतरांना कसे पटले?
  • तथाकथित खुनाच्या कटातील सामील व्यक्ती महाराजांच्या 3 april 1680 in marathi मृत्यूसमयी रायगडावर नव्हत्या असेच दिसून येते.
  • थोड्याफार फरकाने विश्वसनीय समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये शिवरायांचा आजारपणाने नैसर्गिक मृत्यू झाला यावर एकमत आहे.
  • थोडक्यात ब्राह्मण मंत्र्यांनी शिवरायांचा खून केला,असे दर्शवणारी कुठलीही घटना,नोंद आढळत नाही.
  • कोणीही व्यक्ती शिवरायांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असती,तर संभाजीराजांनी त्या व्यक्तीला माफ करणे अशक्य होते.
  • मोरोपंतांचे वृद्धपकाळाने निधन झाले, तर अण्णाजी पंत शिवरायांच्या मृत्यूनंतर सव्वावर्ष जिवंत होते. शिवरायांचा खून केला असता, तर संभाजीराजांनी त्यांना जिवंत सोडले असते का?? त्यांना अष्टप्रधानांत स्थान दिले असते का? निळोपंतानीही इमानइतबारे शंभूराजांची व पुढे शाहू महाराजांच्या कारकीर्दीपर्यंत स्वराज्याची सेवा केली.
  • कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराज, संभाजीराजे व राजाराम या तिघांनाही समकालीन होता, राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून राजारामांच्या हयातीतच त्याने शिवचरित्र लिहिले. मग वडीलांच्या मृत्यूचं काही गूढ होतंच,तर राजारामांनी ते सर्वांसमोर का उघड होऊ दिलं नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. इथेच या समाजघातक्यांची ओरड पुर्णपणे खोटी आहे,हे दिसून येतं.

डोळे असून आंधळ्याप्रमाणे वागणा-या लोकांना समजावून सांगण्याची वा चर्चा करण्याची माझी काहीएक इच्छा नाही.माझा हा प्रयत्न अशा विघातक खोट्या माहितीला बळी पडणा-या सामान्य जनतेसाठी, विनाकरण उठवलेल्या खोचक प्रश्नांनी व्यथित होणा-या माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी आहे.

शेवटी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे म्हणतात त्याप्रमाणे, ” 3 april 1680 in marathi इतिहासात चंदनही आहे आणि कोळसाही फार आहे; आपण काय उगाळावे,हे ज्याचे त्याने ठरवावे.”

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.