Rajarshi Shahu Maharaj information in Marathi – भारतीय समाजात प्राचीन काळापासूनच बालविवाह, विधवा विवाह बंदी, सतीप्रथा, अस्पृश्यता, बहुविवाह, पडदा पद्धती यासारख्या समस्या अस्तित्वात होत्या.
शिवाय या समस्यांना धार्मिक मान्यता असल्यामुळे त्या लोकांवर प्रथा व परंपरा म्हणून लादल्या गेल्या. त्यामुळे समाजातील लोकांनी कर्मकांड विधी व इतर प्रथांना अधिक महत्व देण्यास सुरुवात केली. त्याकाळी शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे सर्वसामान्य माणसांचे आयुष्य दुःखी बनले.
Rajarshi Shahu Maharaj information in Marathi
ब्रिटिश सत्ता व भारतातील इंग्रजी शिक्षणाचा प्रसार यामुळे अनेक भारतीय समाजसुधारक पाश्चात्य तत्वज्ञानामुळे प्रभावित झाले आणि हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सामाजिक-धार्मीक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
त्यात शाहु, फुले, आंबेडकर यांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतात. शाहु महाराज यांनी अस्पृश्य, मागासलेले आणि बहुजन सामाजावरील अन्याय दूर करण्याचे प्रयत्न केले. एक मानवतावादी राजा म्हणुन शाहु महाराजाचे कार्य महत्वपूर्ण ठरतात. ‘Rajarshi Shahu Maharaj information in Marathi’
त्यांनी समाज परिवर्तनासाठी आपल्या सत्तेचा वापर केला. तसेच म. ज्योतिबा फुले यांनी समाजातील विषमतेचे निवारण करुन, शुद्रातिशुद्र व स्त्रियांसह सर्व-सामान्यांना शिक्षणासाठी चालना दिली.
छत्रपती शाहू महाराज माहिती
हिंदूधर्म, ब्राम्हण पुरोहित वर्ग, मुर्तिपूजा, कर्मकांड आणि हिंदू धर्म यावर टिका केली. तर बाबासाहेबांनी देशातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हिंदू धर्मातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी खर्च केले.
एकंदरीत भारतीय घटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, राजकीय नेता, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ आणि एक विचारवंत म्हणून समाजपरिवर्तनाला दिशा देणारे आणि सामाजिक क्रांतीप्रवाहातील
एक कृतिशील विचारवंत म्हणून बाबासाहेबांच्या कार्याचे महत्व आजही अतुल्य आहे. म्हणून भारतीय वैचारीक सुधारणेसाठी शाहु, फुले, आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचे महत्व अनन्य साधारण आहे.
- शोधनिबंधाची उदिष्टये
- राजर्षी शाहु महाराजांचे सामाजिक विचार समजून घेणे.
- महात्मा फुले यांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार स्पष्ट करणे.
- शोधनिबंधाची गृहितकृत्ये
- राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक विचार समाजसुधारणेला दिशा देणारे उरतात.
- महात्मा फुले यांचे सामाजिक विचार समाजोद्धारक ठरतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार समाजाच्या प्रगतीला पोषक ठरतात.
- संशोधन पद्धती
प्रस्तूत शोधनिबंधासाठी दुय्यम तथ्य संकलनाचा आधार घेवून लेखन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यासाठी संदर्भ ग्रंथ, क्रमीक पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे इत्यादीचा आधार घेवून शोधनिबंध तयार करण्यात आलेला आहे. Rajarshi Shahu Maharaj information in Marathi
छत्रपती शाहु महाराज यांचे सामाजिक विचार व कार्य
छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीच्या उन्नतीसाठी कार्य केले. 1908 मध्ये कनिष्ठ जातीत शिक्षण प्रसार करण्यासाठी शिक्षण संस्था स्थापना केली. वसतिगृहे सुरु केली व शिष्यवृत्ती मिळवून दिली.
त्याचबरोबर ‘अस्पृश्य मुलांसाठी वेगळ्या शाळा ही पद्धत बंद केली. त्याचबरोबर 1918 मध्ये बलुता पद्धती नष्ट केली. 1919 मध्ये नळ, विहिरी, धर्मशाळा, दवाखानेव इतर सार्वजनिक ठिकाणेही खुली करुन दिली. आंतरजातीय विवाहास पाठिंबा दिला.
एकंदरीत अस्पृश्यता निवारण करण्याचे महान कार्य केले. श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव नष्ट करुन कनिष्ठांना ५०% जागा राखीव ठेवल्या. नोकरीत कनिष्ठ जातीना आरक्षण ठेवले.
Rajarshi Shahu Maharaj information in Marathi
शाहु महाराज हे लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कुलकर्णी वतने नष्ट करून मोफत व सक्तीचे शिक्षण कनिष्ठांना दिले. मागासवर्गीय उमेदवारही निवडणुक लढवावा अशी त्यांची अपेक्षा होती.
त्याचबरोबर शेतकन्यांच्या जीवनमानाचा स्तर/दर्जा उंचावण्यासाठी व शेतीचा विकास व्हावा म्हणून भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण बांधले. नविन कृषी तंत्रज्ञान आणून 1912 मध्ये हकिंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली. लोकामध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक खेड्यात कृषी विषयक यात्रा व प्रदर्शने आयोजित केली.
शाहु महाराजाने देवदासी स्त्रियांना आपले वारसा हक्क मिळवून दिले व कायद्याचा आधार घेवून ही प्रथा समूळ नष्ट केली. त्याचबरोबर शाहूना, अस्पृश्यासाठी विशेष शाळा काढुन त्यांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. “Rajarshi Shahu Maharaj information in Marathi”
शिष्यवृत्ती आणि अनेक वसतिगृहाची स्थापना केली. शिवाय समाजोपयोगी कार्याचे शिक्षण देणाऱ्या विविध शाळाही स्थापन केल्या व त्यातून सामाजिक न्यायावर आधारलेला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे म्हणता येईल.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक विचार व कार्ये
महात्मा फुले यांची इ.सन 1848 साली पुणे येथे मुलीसाठी शाळा काढुन स्त्री शिक्षणास सुरुवात केली. तसेच त्यांनी केशवपनाविरुद्ध मोहिम, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार केला.
अनाथ, बालिकाश्रम, विधवांचे पुर्नविवाह इत्यादी प्रश्नांबाबत जाणीव जागृती केली. त्याचबरोबर, विधवा विवाह बंदी अस्पृश्यतापालन, निरक्षरता, स्त्रिया व कनिष्ठ जातीचे शोषण इत्यादी अनेक अनिष्ठ प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी स्त्री- पुरुष समानतेचे तत्व अंगिकारले. फुलेनो बालविवाह व विधवाविवाहास बंदी घालून विधवांच्या पूनर्विवाहास चालना दिली. बालहत्या रोखली. त्यांनी मुलीसाठी शाळा काढल्या व स्त्री शिक्षणावर भर दिला.
अनौरस बालकाचे संरक्षण करण्यासाठी 1863 मध्ये ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरु केले. त्यांनी समाजातून जातिव्यवस्थेचे उच्चाटन व सामाजिक समतेच्या प्रस्थापनेचा जोरदारपणे पुरस्कार केला. Rajarshi Shahu Maharaj information in Marathi
राजर्षी शाहू महाराजांचे खरे नाव काय आहे?
कर्नल हायनेस क्षत्रिय-कुलवतन सिंहसनदेश्वर, श्रीमंत राजर्षी सर शाहू छत्रपती महाराज साहिब बहादूर, GCSI, GCIE, GCVO.
कोल्हापूरचा राजा कोण होता?
छत्रपती शाहू महाराज 2 जुलै 1894 रोजी कोल्हापूरचे राजे झाले.