कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार रुपये आर्थिक मदत

By Shubham Pawar

Published on:

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय:  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या कुटुंबाला 50,000 रुपये आर्थिक अनुदान म्हणून दिले जाणार तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे – असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. (50 thousand scheme aid to the families of Corona victims, the Central Government )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोनामुळे बळी गेलेल्या लोकाध्या नातेवाईकांना ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोटांत दिली आहे. पण हे पैसे कसे, की अन कुठे येणार आणि त्यासाठी काय-काय करावे लागणार याबद्दलल अनेकाना माहीत नाही. जाणून घेऊया. यासंदर्भात सरकारने काही नियम ठरवले आहेत.

नक्की कोणाला मिळेल लाभ?

  1. याचा लाभ सरसकट सर्वांना होईल, असे नाही कारण कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला किवा त्याचा संदर्भ मृत्यू प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच नियमावली काढली आहे.
  2. चावणीद्वारे कोरोना झाल्याचे निष्पन झाल्यानंतर मृत्यू झाल्यास ही मदत मिळेल.
  3. टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा घरी किंवा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, अशा लोकांनाच ही मदत मिळणार आहे.
  4. मृत्यू प्रमाणपत्रावर किंवा मृत्यू का झाला याचे कारण डॉक्टरांनी दिलेल्या सर्टिफिकेटवर कोरोनामुळे मृत्यू झालेले नमूद असावे, त्यानंतरच ही मदत मिळू शकणार आहे.

टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अपघात, विष पिऊन आत्महत्या किया इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास तो मृत्यू कोरोनामुळे गृहीत धरला जाणार नाही. त्यामुळे अशांना ५० हजाराची मदत मिळू शकणार नाही.

कोणाच्या खात्यात मिळेल?

ही मदत कोरोनाबळी गेलेल्या लोकांच्या कुठल्याही जवळच्या नातेवाईकाला मिळेल. त्यासाठी कोरोना बळी गेलेल्याचे आधार कार्ड आणि नातेवाईकाचे आधारकार्ड द्यावे लागणार.

किती दिवसांत मिळेल मदत?

केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, ५०,००० रुपयांची ही मदत अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत देण्यात येणार आहे.

कशी असेल प्रोसेस…?

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्लालयात अर्ज सादर करावा लागेल.

  • या अर्जावर संबंधित यंत्रणेला 30 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल
  • मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल
  • अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असणार
  • समितीला जर अर्ज फेटाळायचा असेल तर त्याचे लेखी कारण देणं बंधनकारक

अर्ज कुठे करायचा?

हा अर्ज जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापत कक्षाकडे मिळेल. अर्ज भरून द्यावा लागेल. त्यासोबत

  • मृत्यूचा दाखला
  • मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड
  • ज्यांना मदत मिळणार आहे त्यांचे आधार कार्ड जोडावे लागेल.
  • काही इतर आवश्यक कागदपत्रही द्यावे लागतील.

(50 thousand aid to the families of Corona victims, the Central Government)

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment